लोकनेता न्युज नेटवर्क
आंबुलगा (सूर्यभान बिजलगावे) :- कंधार तालुक्यातील मौ. गुट्टेवाडी येथे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा- २ अंतर्गत लोक सहभागीय पद्धतीने सूक्ष्म नियोजन कसे करावे या बाबत प्रस्ताविकामध्ये सरपंच प्रतिनिधी श्री केशवराव गुट्टे यांनी जनजाग्रती विषयी गावकऱ्यांना माहिती दिली.
गावातील शेतकरी महिला बचतगट, शेतमजूर या सर्वानां सोबत घेऊन मशाल फेरी, शिवार फेरी, श्रम दान गावातील पाणलोट याबाबत सविस्तर असे कृषी पर्यवेक्षक कुरुळा श्री. रघुनाथ नाईक यांनी गावकऱ्यांना मार्गदर्शन केले.
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाअंतर्गत शेती आणि शेतकरी समुदायासाठी ही एक महत्वपूर्ण योजना आहे. योजनेचा मुख्य उद्देश आहे पाण्याची उपलब्धता नैसर्गिक संसाधनांचा योग्य वापर आणि हवामान आधारीत शेती तंत्रदद्यान अवलंबून तसेच कृषी उत्पादनाचे मुल्यवर्धन करणे. या योजनेत महाराष्ट्रातिल बरेच गावे आहेत. ज्यामुळे शेती आणि ग्राम विकासासाठी मदत होईल. अशी माहिती कृषी सहाय्यक पानशेवडी सज्जाचे संभाजीराव वडजे यांनी दिली.
वृक्ष तोडिमूळे घटले ग्रीन कव्हर, पर्यावरणाच्या हासाची अनेक कारणे आहेत, त्यापैकी आग लाऊन देणे हे एक मोठे कारण आहे. शेतातील अवशेष जाळणे, बांधावरील गवत जाळणे, काटेरी कुंपण यातून आग पसरते. मोहाची फुले गोळा करण्यासाठी झाडाखाली पाला-पाचोळा जाळणे, यातून शेतकऱ्यांचा कड़वा व गवताच्या गंजी जळून गेल्या आहेत. उन्हाळ्यात झाडाला नवी पालवी फुटलेली वृक्षवेली जळून जातात. त्यासोबतच सरपटणारे जीव, पक्षाची अंडी, जमीनिवरील सूक्ष्म जीव व घटक कायमचे नाहीसे होतात. वृक्षाना आलेला फुलोरा, जमिनिवर पडलेले बीज जळून राख होते. यामुळे नैसर्गिक बीजोत्पती थांबते म्हणून विनंती आहे आग लाऊ नका.
जलतज श्री. प्रा. डॉ. पुरुषोतम वायाळ सर यांच्या जलतारा प्रकल्पाची माहिती देऊन पाण्याचे पूर्नभरण करण्याची माहिती दिली. कृषी विभाग तुमच्या सोबत आहे. यावेळी गावातील प्रतिष्ठीत व्यक्ती माजी सरपंच उद्धवराव गुट्टे, गोविंद गुट्टे, भगवान गुट्टे, त्रिपती गुट्टे, नामदेव वाघमारे, गंगाधर वाघमारे, दैवशाला गुट्टे, सुमनबाई गुट्टे, ग्राम कृषी संजीवनी समितीचे सर्व सदस्य शेतकरी महिला भगिनी मोठ्या संखेने उपस्तीत होते.
------------------------------------------
🪀सर्व महत्वाच्या अपडेट मिळवा Whatsapp वर नंबर सेव्ह करा व लोकनेता न्युज ला जॉईन व्हा 👉 https://join.lokneta.in/
Post a Comment