छत्रपती संभाजीनगर :- नुकताच बुद्ध जयंती च्या पर्वावर साहित्यिक व सामाजिक क्षेत्रातील कार्यासाठी महाराष्ट्रंच नव्हे तर अंतर्राष्ट्रीय स्तरावर सुप्रसिद्ध असलेल्या साहित्यधारा बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, छत्रपती संभाजीनगर तर्फे स्थानिक नागसेन वन स्थित डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयाच्या सभागृहात संपन्न झालेल्या सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, कला, क्रिडा इत्यादी क्षेत्रांत समर्पित कार्य करणाऱ्या काही मान्यवरांना पुरस्कृत करण्यासाठी तसेच चळवळीतील साहित्यिक कवींच्या वैचारिक मंथनासाठी आयोजित राज्यस्तरीय कविसंमेलना मध्ये अध्यक्ष या नात्याने, सध्याच्या भयग्रस्त सामाजिक परिस्थितीत परिवर्तन घडवून आणायचे असल्यास साहित्यिक कवी व्यतिरिक्त ते कुणीही घडवू शकणार नाही, हे सांगत असताना, साहित्यिकांनी कुणाचीही व कशाचीही भिती न बाळगता निर्भिडपणे आपले विचार मांडणे आवश्यक आहे हे विषद करताना आपल्या वैशिष्ट्यपूर्ण शैली व काव्यगायन तथा सडेतोड वक्तव्यासाठी अंतर्राष्ट्रीय ख्यातिप्राप्त डॉ. विजयकुमार कस्तुरे यांनी आपल्याच कवितेच्या उपरोक्त विधान ओळी सांगून उपस्थित मान्यवरांना त्यांच्या सामाजिक जबाबदारीची जाणीव करून दिली. प्रा. डॉ. प्रिती कांबळे, विज्ञान महाविद्यालय, अंबेगाव, पुणे, मा. वैशाली साळवे, असि. कमिशनर, वस्तू व सेवाकर विभाग, छ. संभाजीनगर, सुप्रसिद्ध नाट्यकर्मी मा. रमाकांत भालेराव, छ. संभाजीनगर, उद्योजक मा. विनोद कांबळे, छ. संभाजीनगर, डॉ. ज्ञानेश्वर संसारे, प्रशासकीय अधिकारी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जालना तथा स्वागताध्यक्ष असलेल्या व आपल्या; वैशिष्ट्यपूर्ण कथाकथनास्तव अंतर्राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त डॉ. बबनराव महामुने, छ. संभाजीनगर, डॉ. डी. व्ही. खरात सर, चिखली इ. च्या प्रमुख उपस्थितीत तसेच मार्गदर्शनाखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छ. संभाजीनगर चे अर्थशास्त्र विभागाचे प्राध्यापक तथा स्कॉटलंड यार्ड स्टुडंट्स ब्रॅंड ॲंबेसेडर प्रा. डॉ. संघर्ष सावळे यांनी उपरोक्त संस्थेचे अध्यक्ष म्हणून दि. ११-०५-२०२५ रोजी आयोजित केलेल्या या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमात उपस्थित सर्व मा. साहित्यिक कवींनी आपले विचार मांडून व कविता सादर करून या सोहळ्याची उंची वाढविली. सुरेख सूत्रसंचालन नाशिक येथील कवी बाळासाहेब गिरी यांनी केले.
________________________
Post a Comment