अखंड भारताच्या कानाकोपऱ्यात मनामनात राष्ट्रीय एकात्मता व सर्वधर्मसमभाव पेरण्यासाठी साहित्यिकांनी वसा उचलणे ही काळाची गरज - ॲड. डॉ. विजयकुमार कस्तुरे, चिखली

लोकनेता न्युज नेटवर्क

हम्पी - कर्नाटक :- हिंदी अनुसंधान प्रसार केंद्र, अहिल्या नगर या सुप्रसिद्ध साहित्यिक संस्थेच्या संस्थापक तथा साहित्यिक क्षेत्रातील विविध भाषिक अनुवाद व समिक्षणासाठी ख्यातनाम असलेल्या डॉ. संजय बोरूडे, मा. रचना स्वामी तथा तथा त्यांच्या सहकारी ज्येष्ठ कवयित्री मा. आशा डांगे, छत्रपती संभाजीनगर इ. नी सर्व देशभरातील विविध प्रांतिक व विविध भाषिक साहित्यिक रसिकांना एकत्र करून कर्नाटकातील सुवर्णाक्षरांनी लिहिल्या गेलेल्या १४ ते १६ व्या शतकातील विजयनगर साम्राज्याच्या वैभवशाली पाषाण शिल्पांच्या साक्षीने ऐतिहासिक हम्पी च्या निसर्गरम्य परिसरात हॉटेल मयूरा भुवनेश्वरी येथे दि. १२, १३, १४ मे, २०२५ रोजी भरविलेल्या अविस्मरणीय साहित्य जत्रे मधील उदघाटकीय सत्रातील प्रमुख अतिथी या नात्याने आपले एल्गार भाष्य करताना आपल्या वैशिष्ट्यपूर्ण काव्यशैली तथा लिखाण व कलात्मक सादरीकरण आणि सामाजिक कार्यास्तव अंतर्राष्ट्रीय स्तरावर सातासमुद्रापार ख्याती प्राप्त डॉ. विजयकुमार कस्तुरे, ॲडव्होकेट, चिखली, महाराष्ट्र यांनी वरीलप्रमाणे विधान करून सर्वांची मने जिंकली. कर्नाटक मधील सुप्रसिद्ध कन्नड लेखक तथा साहित्यिक पत्रकार मा. सरजू काटकर बेलगावी यांच्या हस्ते उदघाटन झालेल्या या काव्य महोत्सवाचे प्रमुख अतिथी या नात्याने वेस्ट बेंगालचे हिंदी कवी, लेखक व ज्येष्ठ साहित्यिक मा. विमलेश त्रिपाठी, पंजाब साहित्य अकादमीचे अध्यक्ष मा. डॉ. सुखदेवसिंग सिरसा, चंदिगड, महाराष्ट्रातील ख्यातनाम विडंबनकार कवी तथा साहित्यिक मा. प्रभाकर साळेगावकर, माजलगाव, सुप्रसिद्ध कन्नड लेखक चंद्रशेखर वस्त्राद, गर्लाग या मान्यवरांच्या साक्षीने व वैचारिक प्रस्तुतिने या सोहळ्याची सुरुवात होऊन त्यानंतर तीन दिवसांच्या सलग साहित्यिक आविष्कार मालिकेत एकूण आठ कवि संमेलने तथा विविध गहन विषयावरील परिसंवाद व चर्चासत्रे संपन्न होवून आपापल्या क्षेत्रातील तथा देशभरातील बहुभाषिक साहित्यिक लिखाणाच्या माध्यमातून, देशाच्या वर्तमान भयाण व जातीधर्माच्या नांवाखाली वारंवार उफाळून येत असलेल्या दंगलसदृश परिस्थितीत प्रागतिक, पुरोगामी व सामाजिक सलोखा व राष्ट्रीय एकात्मता घडवून सर्वत्र प्रेमाचे, आपपरसमभाव व समजूतदारपणाचे वातावरण कसे निर्माण करता येईल व आपसातील विश्वास कसा प्रस्थापित करता येईल यावर भारताच्या बहुतांश भागातून आलेल्या साहित्यिक, कवि, लेखक, कलावंत विद्वत्जनांनी आपापल्या परीने पण प्रभावी पध्दतीने काव्याविष्कार घडवून तसेच सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून प्रबोधन केले. एका कविसंमेलनाचे अध्यक्ष म्हणून डॉ. कस्तुरे यांनी त्यांच्या - शाहू राजा..... या कविता गायनाने सर्वांच्या मनाचा ताबा घेतला. मा. ज्येष्ठ साहित्यिक मंडळी - भास्कर निर्मळ सर, छ. संभाजीनगर, सतीश कुलकर्णी, हवेरी, प्रा. जयसिंग गाडेकर, पुणे, रचना, अ.नगर, डॉ. उर्मिला चाकूरकर, पैठण, मोहन सिरसाठ, वाशिम, सुमा काटकर, बेळगावी, रवी चापके, पुसद, महेश बल्लारी, कोप्पल, डॉ. अनिरुध्द कुश्तागी, कोप्पल, डॉ. बाळासाहेब शिंगोटे, अ.नगर, गिरीश सोनार, लोणी, आशा डांगे, छ. सं.नगर, साक्षी तिकोटीकर, कोप्पल, राजेश बल्लारी, कोप्पल, यशवंत माळी, सांगली, सुरेश अक्कल, छ. सं.नगर, रवी कोटारागस्ती, बेळगावी, संतोष नाईक, हुंगुंड, मंगल फुलारी, नांदेड, बापू दारी, नांदेड, बालकवयित्री यशश्री सरवदे, अंबाजोगाई, डॉ. विठ्ठल गायकवाड, होस्पेट, देवीदास फुलारी, नांदेड, रामदास काळे, नेवासा, सुनील गायकवाड, चाळीसगाव, डॉ. सविता लोंढे, छ. सं.नगर, दादा ननावरे, अ.नगर, डॉ. संजय बोरूडे, अ.नगर, मनिषा घेवडे, मुंबई, मिस. कार्तिकी पवार, अन्.नगर, सुजाता भोजने, अंबाजोगाई, राजेसाहेब कदम, अहमदपूर, अनिल चवळे, अन्.पूर, सुनील डोके, छ. सं.नगर, संगीता गाडेकर, पुणे, डॉ. डी. व्ही. खरात, चिखली, राकेश साळुंखे, सातारा, प्रा. सरीता चापके, पुसद व इतर अशा अनेक मान्यवर कवी, लेखक, साहित्यिक तथा कलावंतांनी या राष्ट्रीय व बहुभाषिक काव्य महोत्सवामध्ये डॉ. बाळासाहेब आंबेडकरांच्या संविधान स्वप्नातील भारत निर्मितीमधील आपला समर्पक वाटा व वसा उचलून राष्ट्रीय एकात्मता व सर्वधर्मसमभाव निर्मितीस मोलाचे सहकार्य केले. रवी चापके, सरीता चापके, सुजाता भोजने, रचना ताई तसेच सर्वच सूत्र संचालकांनी आपल्या शैलीने कार्यक्रमात बहार आणली. या सोबतच सर्व ऐतिहासिक स्थळांना भेटी देताना हजारो पाषाणातील शिल्पे, कलात्मकता व वैभव पाहून सर्वत्र केवळ आणि केवळ पाषाणांचेच डोंगर असताना त्याही परिस्थितीत एवढे प्रचंड राजवैभव आणि सांस्कृतिक वारसा जपणारे साम्राज्य निर्माण करणारांबरोबरच ते घडविणाऱ्या कलावंतांचे कौतुक करण्यास शब्द अपुरे पडतात. हॉटेल मयूरा च्या व्यवस्थापक तथा सेवाभावी कर्मचाऱ्यांनी तसेच साहित्यिक मंडळींच्या जाण्यायेण्यासाठी ठरविलेल्या बसच्या चालक तथा त्यांच्या सहकाऱ्यांनी सुध्दा व्यवस्थेमधे कसलीही कसूर ठेवली नाही. अशा या सर्वार्थ संपन्न सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी मा. संजय बोरूडे, रचना तथा आशाताई डांगे यांचे करावे तितके कौतुक थोडेच ठरावे.
________________________

0/Post a Comment/Comments