हिमाचल प्रदेश बहुभाषिक राष्ट्रीय काव्य महोत्सव तथा पुरस्कार वितरण सोहळा - तिबेटीयन बुद्ध विहार मनाली च्या अध्यक्षपदी - ॲड.डॉ. विजयकुमार कस्तुरे

लोकनेता न्युज नेटवर्क

छत्रपती संभाजीनगर :- येथील अंतर्राष्ट्रीय स्तरावर ख्यातनाम असलेल्या बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, छत्रपती संभाजीनगर तर्फे दि. २० मे ते २८ मे, २०२५ दरम्यान आयोजित हिमाचल प्रदेश काव्य महोत्सव व पुरस्कार वितरण सोहळ्याच्या तिबेटीयन बुद्ध विहार, मनाली येथे देशभरातील साहित्यिक कवी तथा विद्वत्जनांच्या उपस्थितीत संपन्न होत असलेल्या बहुभाषिक राष्ट्रीय कवी संमेलन तथा पुरस्कार वितरण सोहळ्याचे अध्यक्ष म्हणून डॉ. विजयकुमार कस्तुरे, ॲडव्होकेट, चिखली, जि. बुलढाणा यांना निमंत्रित करण्यात आले असून तसे सादर निमंत्रण संस्थेचे अध्यक्ष तथा स्कॉटलंड यार्ड स्टुडंट्स ब्रॅंड ॲम्बेसेडर व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, (औरंगाबाद ) छत्रपती संभाजीनगर मधील अर्थशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ. संघर्ष सावळे यांनी संस्थेच्या व बहुजन साहित्य संघ चिखली च्या सन्माननीय पदाधिकाऱ्यांच्या  उपस्थितीत, त्यांना देऊन छत्रपती संभाजीनगर येथे हार्दिक अभिनंदनासह त्यांचा सत्कार केला. त्यावेळी डॉ. डी. व्ही. खरात सर, डॉ. बबनराव महामुने, भावकवी अंकुश पडघान, मा. शिंदे सर इ. मान्यवर उपस्थित होते. डॉ. कस्तुरे यांनी या अगोदर नेपाळ काठमांडू येथे आयोजित अंतर्राष्ट्रीय बहुभाषिक कवी संमेलन, केरळ काव्य महोत्सव, तेरावे झेप साहित्य संमेलन, शिरूर अनंतपाळ साहित्य संमेलन तथा विविध कवी संमेलनात अध्यक्षपद भूषविले असून गुजरात, गोवा, कर्नाटक तथा कलकत्ता बहुभाषिक राष्ट्रीय कवी संमेलनात प्रमुख अतिथी म्हणून त्यांनी आपली आगळी वेगळी ओळख निर्माण केली असून देहूरोड बुद्ध भूमी चा भीम रत्न, केंद्रीय मानवाधिकार संगठन नई दिल्ली तर्फे राष्ट्रीय मानवाधिकार गौरव, महाराष्ट्र राज्य संविधान परिषदेतर्फे संविधान गौरव, ग्लोबल ह्यूमन राईटस् प्रोटेक्शन फोरम चा आलोक बॅनर्जी मेमोरियल ॲवॉर्ड, बाबू जगजीवनराम ॲकॅडेमी, गोवा तर्फे बाबू जगजीवनराम पुरस्कार, राममोहन विद्यासागर ॲकॅडेमी, कलकत्ता, वेस्ट बेंगाल च्या वतीने इश्वरचंद्र विद्यासागर आणि राजा राममोहन रॉय पुरस्कारां सह देशाच्या विविध भागांतून अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलेले असून त्यांच्या समर्पित मानवीय सेवा कार्यास्तव साऊथवेस्टर्न अमेरिकन विद्यापीठातर्फे त्यांना मानद डॉक्टर ऑफ सोशल वर्क्स् या सर्वोच्च पदवीने सन्मानित करण्यात आलेले आहे. तसेच त्यांच्या बहुचर्चित आणि आजच्या काळात कुटुंब संस्थेला लागलेल्या घरघरीमधे त्यांच्या - 
त्या तरूच्या सावलीला,
चल सखे बोलू जरा -
या एका मजल - कवितेने तर अंतर्राष्ट्रीय भरारी घेतली असून साहित्यिक रसिकांच्या मनावर अनोखे प्रतिबिंब ऊमटविले आहे. त्याचबरोबर बहुजन साहित्य संघ, चिखली च्या माध्यमातून त्यांनी अनेक साहित्य तथा कवी संमेलने भरवून शेकडो कवी - साहित्यिक तसेच विविध सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, कला, क्रिडा इ. क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार व सन्मान केला आहे. अशा वेळी साहित्य धारा तर्फे देण्यात आलेल्या या सन्मानामुळे त्यांच्या साहित्यिक कारकिर्दीत आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला असल्याने त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.
________________________

0/Post a Comment/Comments